स्वप्न माझे तुझे
एक व्हावे
शब्द शब्दा वाचून जिवन अपुरे आहे. भावने वाचून शब्द अपुरे आहे.

image source google/image by ....
घर फक्त चार भिंतीच् नसतं ,
तर त्यात राहणाऱ्या बोलक्या माणसाचं असतं ,
घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात लपलेली असते माणसांची कहाणी ,
भिंती भिंतीवर असते आठवणीं ची निशाणी ,
घर चार ताळाच् असो , किंवा चार भिंतीच् ,
खर घर तर असतं ते माणसांच्या जिव्हाळ्याच ,
घर छोट असो किंवा मोठं ,
त्यात नेहमी असावे हसणारे ओठ ,
घर सामनांनी जरी असेल रिते ,
तरी त्यात हवे प्रेमाचे नाते ,
घरावर चालतील गळके पत्र ,
मात्र भक्कम असावे वात्सलेचे छत्र ,
घरात जरी मनमोकळी नसेल जागा ,
तरी आयुष्यभराचा संस्कार असतो प्रेमाने वागा ,
घरात जरी असेल मातीचा गोबा ,
दुडू दुडु धावणाऱ्या पावलांनी त्यालाही येते शोभा ,
घर फक्त घर नसते ,
ते तर अतूट नात्यांची वीण असते .
मी जेव्हा पहिले तुला ,
माझे आयुष्य मानले तुला ,
तेव्हापासून माझ्या स्वप्नात तुझाच चेहरा दिसतो पुन्हा पुन्हा ,
तू दुःखी असला की मी ही दुःखी असते ,
तू आनंदी असला की मी ही आनंदी असते ,
ह्याची फिलिंग मैत्रिणींनी करून दिली मला ,
तू जेव्हा मला पहिल्यांदा बोललास ,
तेव्हापासून कायम माझच राहिलास ,
तुझ्या मनात काय होते ठाऊक नव्हते मला ,
माझ्या मनात मात्र तू माझा व्हावा हेचं होते ,
तू जेव्हा मला पहिल्यांदा i love you म्हटला ,
तेव्हा आकाश ठेंगणे झाले मला ,
तुझ्यासोबत
सप्तपदी चालण्याचे स्वप्न पाहिले मी नव्याने ,
तुझे माझे काय नाते माहीत नाही मला ,
तरीही आयुष्यभर जपणार आहे तुला ,
तुझ्या आनंदात आणि दुःखात अर्धी वाटेकरी मीच असणार ,
आज सप्तपदी चालण्याचे वचन दे तू मला ,
आयुष्यभर तुझी अर्धांगिनी होण्याचे वचन देते तुला ,
आपण ही प्रेमकहाणी करू कंप्लीट ,
आणि आयुष्यात होऊ परफेक्ट .....
थोडा फार संकोच असावा
,तिरस्कार असेल दिसू न द्यावा ,
प्रेम कधी व्यक्त न करावं ,
जीव लावलेला कधी दाखवू नका ,
प्रेमाने घास भरवलेला कधी बोलून दाखवू नका ,
सुख दुःख समान माना ,
परिस्थितीवर मात करण्याची जिद्द ठेवा ,
आलेली वेळ निघून जाईल ,
सर्वकाही सुरळीत होईल ,
सतत स्वतःला सांगा ,
मनातला मोर मनातच नाचावा ,
थोडा फार संकोच असावा ,
राणी घायाळ झाली ,
राजाला बोलण्यासाठी व्याकुळ झाली ,
रड रड रडु लागली ,
देवाला विणवू लागली ,
माझ्या राजाला समजावं ,
प्लीज त्याला माझ्याकडे परत पाठव ,
तुझ्या साथीने आम्ही एकमेकांना ,
दिलेले वचन आठव ,
ते सर्वस्व होतं माझ ,
पाहिलं प्रेम एक दीर्घ श्वास ,
जीवन जगण्याचा ध्यास ,
अजुनही त्याला भेटण्याची आस ,
कारण तो आहेच खूप खास ,
एक होऊ दे देवा त्याच्या माझ्या ,
नशीबाची रेषा .....
असं म्हणत राणी आतून ,
जळू लागली ,
आसवांना पिऊ लागली ,
राजा येईल ह्या आशेवर रात रात जागू लागली ,
. मैत्री कोणत्याही नात्यात असो ती मैत्री असते . कोणाच्यातरी येण्याने आपली मैत्री तुटेल एवढी कमकुवत मैत्री नक्कीच नसावी .
-नित्या मते
जिवनाचा आनंद मी गवसला
माझ्या शब्द ओवीत तो मी मांडला
अधीर झालेले मन हे स्थीर झाले.
शब्दात मी माझा आनंद गवसला
स्वप्न माझे तुझे एक व्हावे